Thursday, March 10, 2011

१९७० - १९७८ च्या काळात लिहिलेल्या काही कविता.

१९७० - १९७८ च्या काळात आईने लिहिलेल्या काही कविता.

दर्पण बघूनी, सुस्वरूप आपुले
काय गे मनी तरंग उठले?
खुदकन तुझी का गे कळी फुलली?
गुपीत गोष्ट का तुज स्मरली?

रोखूनी नयने काय पाहसी?
मृगाक्षी कुणी म्हंटले स्मरशी
गालावर का चढमी लाली
गोड फसवणूक तुज आठवली

ओठात तुझ्या ग कोणते गीत?
मधुर मीलनाचे का हे संगीत
पदर सावरूनी का गे उठली
चाहूल का कुणाची लागली

- चि. सुषमा गणेश पाटण्कर (सौ. सुषमा मधुकर खरे)
नोव्हेंबर १९७०

No comments:

Post a Comment