Thursday, March 10, 2011

१९७० - १९७८ च्या काळात लिहिलेल्या काही कवितां पेकी एक

मी कशी आहे, मी कशी आहे
जशी आहे तशीच, तशीच राहणार आहे ॥

अशी नको म्हणून असणार आहे
अशी हवी म्हणून नसणार आहे
जशीच्या तशीच राहणार आहे
न बदलणारी, न बदलणारी ॥

निराशा पदरी पडली तरी
आशेने वाट पाहणार आहे
नको नको म्हणतानाच
माझे मन गुंतणार आहे ॥

वेड्या सारखी स्वत:ला
अशीच हरवणार आहे
खुळ्यासारखी मी माझे
मी पण विसरणार आहे ॥


- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे).

No comments:

Post a Comment