Thursday, March 10, 2011

इंदीरा गांधीनी आणीबाणी जाहीर केली

१९७० - १९७८ च्या काळात आईने लिहिलेल्या काही कविता.

(देहाची तिजोरी, भक्तिचाच ठेवा ह्या चालीवर )

मंत्र्यांची तिजिरी पैशाचाच ठेवा
उघड डोळे जनता आता उघड डोळे जनता ॥ धृ ॥

उजेडात सत्यवान अंधारात कब्जीराव
त्यांचे हाती आहे बाबा पैसेवाले राव
गोरगरीबांची मते पैशाने फोडावी ॥ १ ॥

स्वार्थ जणू अंतर्यामी पूर्ण भिनलेला
गरीबी हटाबोचा घोष उगा धरलेला
संबधीत अपराधांचा गुन्हा सावरावा ॥ २ ॥

तुझ्या हाती पांडूरंग देशाचेच हित
स्वार्थी नेत्यांपासून कर मतदारांना मुक्त
योग्यमार्ग सकला आता तूच दाखवावा ॥ ३ ॥

टिप : इंदीरा गांधीनी आणीबाणी जाहीर केली व निवडणूकी साठी म्हणून गरीबी हटाओचा नारा त्या काळी दिला होता.

- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे).
मार्च १९७१

No comments:

Post a Comment