Thursday, March 10, 2011

मुंबईत सागराने जेंव्हा झोपडपट्टी उध्वस्त केती.

सागरा तू ही नाहीस ना
गरीबांचा वाली
दाही दिश्या भटकतात
वीतभर भरण्यासाठी
पोवची खळगी
गुरासारखे राबतात
निदान एक वेळची
अर्धिभूक भागविण्यासाठी

आले होते ते बिचारे
तुझ्या असण्याला
निदान तू तरी तुझ्या
थंड पाण्याच्या शिडकावाने
शिण घालवशील म्हणून
पुन्हा काबाड कष्ट करण्यास
नवे जीवन देशील म्हणून

पण तू ! तू निघालास
उलट्या लाळजाचा, उन्मत्त !
तू ही गरीबांना हतविलेस
घाम गाळून साठविलेले
किडूक मिडूक
ते ही तू गिळून टाकलेस
तुला नाही दिसल्या उत्तुंग इमारती
काळ्या पैश्याचा दिमाख दाखविणाऱ्या
-
-
-
सागरा तूही शेवटी
खारटच निघालास रे सागरा !


- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे).
१९७० - १९७८ च्या सुमारास

No comments:

Post a Comment