Thursday, March 10, 2011

१९७० - १९७८ च्या काळात लिहिलेल्या काही कविता!

क्षणभर आलास तरी चालेल
पण मुसळधार पावसा सारखा ये
माझ्या जीवनात
प्रेमाने चींब भिजवायला ॥

क्षणभर आलास तरी चालेल
पण वादळ वाऱ्यासारखा ये
माझ्या जीवनात
चैतन्य बी पेरायला ॥

क्षणभर आलास तरी चालेल
पण चमकणाऱ्या विजेसारखा ये
माझ्या जीवनात
जीवन उजळून टाकायला


- चि. सुषमा गणेश पाटणकर (सौ. सुषमा मधुकर खरे).
१९७०-१९७८

No comments:

Post a Comment