Thursday, March 10, 2011

भारत भू - अटल बिहारी ह्यांच्या करीता लिहिलेली कविता

भारत भू मधे कधीही
नाही ____ संतांची
वंदनीय ___, पांडूरंग
बहूत असती संत महंत
गरज आहे रामदासांची
कोट्यावधी शिष्यगणांची
गरज आहे सांगण्याची
तुमच्या हाती शक्ती आहे
रामराज्या बनवण्याची
रामराज्या बनवण्याची ॥

स्वदेश रक्षणाकरीता
नाही गरज यज्ञयागाची
गरज आहे आत्याधुनीक
शस्त्र अस्त्र असण्याची
शस्त्र अस्त्र असण्याची ॥

देश समृध्द करण्यासाठी
नाही गरज विदेशाची
गरज आहे सर्व्जनांनी
स्वदेश प्रेम बाळगण्याची
स्वदेश प्रेम बाळगण्याची ॥

गरज आहे श्रीकृष्णाची
जनतार्जुनाला सांगण्याची
मतदानाचा हक्क बजावून
सुयोग्य व्यक्ती निवडण्याची
सुयोग्य व्यक्ती निवडण्याची ॥

गरज आहे दिशासाठी
स्थिर सरकार असण्याची
अटळ सुराज्यासाठी
अटल पंतप्रधान होण्याची ॥


- सौ. सुषमा मधुकर खरे.

No comments:

Post a Comment